Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

निकाल 2025: बारावी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट | महाराष्ट्र बोर्ड

निकाल 2025: बारावी- दहावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!

निकाल प्रतीक चित्र

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा २०२५ यंदा नियोजित वेळेपेक्षा १० दिवस आधी घेण्यात आल्या. त्यामुळे निकालही अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

त्यांच्या मते, गुणांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून गुणपत्रिका तयार करण्याचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल ५ मे ते ७ मे दरम्यान, तर दहावीचा निकाल १५ मे ते १८ मे दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.

बोर्डाने सांगितले की, निकाल वेळेआधी घोषित करून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक टप्प्यासाठी अधिक वेळ मिळावा, हा उद्देश आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडचण होणार नाही याची खात्री देण्यात आली आहे.

शासनाच्या सूचना:

  • प्रवेशासाठी लागणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी वेळेआधीच अर्ज करा.ऐनवेळी धावपळ होणार नाही याची काळजी घ्या
  • दिशाभूल होणार नाही याची खबरदारी घ्या. कोणत्याही खाजगी संस्थेच्या अमिषाला बळी पडू नका.
  • शाळा व मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची माहिती देणे गरजेचे आहे.

सोमवार, २१ एप्रिल, २०२५

राज्यभरात भ्रष्टाचाराच्या राक्षसाचे थैमान !
Special Report आपले सरकार सेवा केंद्र

डिजिटल इंडिया च्या उपक्रमाला भ्रष्टाचाराची वाळवी? ‘आपले सरकार’ पोर्टलला पर्याय म्हणून दलालीचा गोरखधंदा फोफावतोय!

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू केलं. या पोर्टलच्या माध्यमातून जात, उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमिलेअर, इ. शासकीय दाखले मिळवण्यासाठी फक्त ₹३३.६० इतकं माफक शुल्क आकारलं जातं. तसेच शासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे १५ दिवसांचा कालावधी लागतो.

मात्र प्रत्यक्षात ही प्रक्रिया तितकी पारदर्शक राहिलेली नाही. अनेक सेतु कार्यालये व खासगी सेवा केंद्रे दाखले मिळवून देण्यासाठी नागरिकांकडून ₹४०० ते ₹५०० पर्यंतची रक्कम आकारतात. एवढंच नाही, तर या व्यवहारांमध्ये तहसीलदार, तलाठी यांसारख्या शासकीय अधिकाऱ्यांचाही ‘कमिशन’ स्वरूपात सहभाग असल्याची चर्चा आहे.

कमी कागदपत्रे असलेल्यांची अडचण, दलालांची संधी!

नागरिकांकडे काही आवश्यक कागदपत्रे नसल्यास, ‘आपले सरकार’ पोर्टलवर अर्ज करताना अडथळे येतात. अशावेळी दाखला लवकर मिळावा म्हणून नागरिक हे सेवा केंद्र, सेतु कार्यालय यांच्याकडे वळतात. तेथे त्यांना अतिरिक्त रक्कम भरावी लागते, पण काम काही दिवसांत होते.

एका नागरिकाने सांगितले की, “जे कागदपत्रे मी सेवा केंद्रात दिली, तेच जर पोर्टलवर दिले असते, तरी माझा अर्ज मंजूर होईल का? लवकर दाखला मिळेल का ? यामुळे ऑनलाईन अर्ज न करता सेतु कार्यालयात अक्कलखाती पैसे देऊन दाखला मिळावावा लागतोय” यावरून जनतेचा प्रशासनावरील अथवा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरील विश्वास डगमगतोय, हे स्पष्ट दिसते.

योजनेच्या हंगामात दलालांची 'दिवाळी'

शालेय प्रवेश, महाविद्यालयीन दाखले, सरकारी योजना – या काळात सेवा केंद्र व सेतु कार्यालयांची कमाई अक्षरशः 'फुलते'. गरजूंना वेळेवर दाखले मिळावेत म्हणून अधिक पैसे मोजावे लागतात. यामुळे शासनाच्या 'डिजिटल इंडिया' उपक्रमाचा हेतूच हरवत चालला आहे.

नेमकं घडतंय काय?

  • शासकीय सेवा खासगी दलालांकडे सरकत आहेत.
  • पारदर्शकतेचा अभाव आणि दलालीला उत्तेजन.
  • सामान्य नागरिक आर्थिक शोषणाला बळी पडतोय.
  • प्रशासनावरील लोकांचा विश्वास ढासळतोय.

शासनाने दिलेल्या डिजिटल सेवा सुविधा ह्या प्रत्येक नागरिकापर्यंत सरळ, सुलभ आणि भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने पोहचणं अपेक्षित होतं. मात्र आज प्रत्यक्षात पैशांच्या मोबदल्यात दाखले मिळवणं ही गरज झाली आहे, हक्क नव्हे.

आमची WhatsApp ग्रुप लिंक

शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

धान्य वितरणातील अनागोंदी विरोधात निवेदन

धान्य वितरणातील अनागोंदी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन

नाशिक, १८ एप्रिल २०२५

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली धान्य वितरण कार्यालयातील अनागोंदी कारभाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील रेशनिंग व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक शिधा पत्रिकांमध्ये ऑनलाईन नावे दिसत नसल्यामुळे नागरिकांना KYC अथवा बायोमेट्रिक कारणास्तव वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.

अनेक रेशन दुकानांतून ऑनलाईन नावे असतानाही कमी प्रमाणात व निकृष्ट दर्जाचे धान्य दिले जात आहे. प्रत्येक दुकानात मोफत KYC व बायोमेट्रिक सुविधा उपलब्ध असताना देखील काही दुकानदार नागरिकांकडून पैसे मागत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

धान्य वितरण कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट असून त्यांच्यामार्फत पैसे देऊन त्वरित काम होत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वर डाऊनची कारणे देत नागरिकांना वेळेवर धान्य मिळत नाही. शिधा पत्रिका बंद झाल्यानंतर अनेक वेळा अर्ज करूनही नव्या पत्रिका मिळत नाहीत.

पंचवटी भागातील मोरे मळा, हनुमानवाडी, क्रांती नगर, उदय कॉलनी या परिसरातील रेशन कार्ड्स सुमारे ३ किमी अंतरावरील शनिमंदिर पेठरोड परिसरातील दुकानांशी जोडण्यात आले आहेत. परिणामी, मोफत धान्य घेण्यासाठी नागरिकांना सुमारे ₹२०० पर्यंतचे रिक्षा भाडे सहन करावे लागत आहे. म्हणून हे रेशन दुकान क्रांतीनगर परिसरात सुरू करावे, किंवा नागरिकांची कार्डे त्यांच्या जवळील दुकानांशी जोडावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

धान्य वितरण कार्यालयातील अनागोंदी कारभार तत्काळ थांबवून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आठवड्यातून एकदा कॅम्प लावून त्यांची कामे मार्गी लावावीत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

उपस्थित मान्यवर

जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड, ॲड. शाम तावरे, ॲड. संदीप दंडगव्हण, ॲड. विलास डोंगरे, चेतन सोनवणे, ॲड. ज्योती साळवे, भास्कर आवारे, बाबुराव साठे, पंढरीनाथ बागुल, निलेश वराडे, ॲड. प्रतीक्षा चौधरी, ज्योती जाधव, अशोक श्रीखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

बुधवार, १६ एप्रिल, २०२५

मनपा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मार्च महिन्याचे मानधन रखडले
मनपा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मार्च महिन्याचे मानधन रखडले
नाशिक –

नाशिक महानगरपालिका हद्दीतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मार्च महिन्याचे मानधन अद्यापही जमा झालेले नाही. यामुळे शेकडो महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आर्थिक वर्ष २०२४–२५ च्या समाप्ती महिन्याच्या शेवटी येणाऱ्या मार्च महिन्यात तांत्रिक अडचणी असल्याचे कारण प्रशासनाकडून देण्यात आले आहे, मात्र मानधन केव्हा मिळेल याबाबत स्पष्टता नाही.

ERP प्रणालीमध्ये अडचण असल्याचे सांगितले जात असून, काही बिले अद्याप पाठवलेच गेले नसल्याचे समजते. डिजिटल युगातही अशा अडचणींमुळे महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या मानधनापासून वंचित राहावे लागत आहे.

कामगार कायदा व संविधानाच्या तरतुदींनुसार, चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ७ तारखेच्या आत पगार मिळणे बंधनकारक आहे. मात्र नाशिक महानगरपालिका या नियमांचे उल्लंघन करत असल्याने प्रशासनावर टीका होत आहे. वेळेवर पगार न मिळाल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

प्रशासनाचा कारभार संथ असून, आधुनिक तंत्रज्ञान असतानाही कामे वेळेवर पूर्ण न होणे ही गंभीर बाब आहे. नाशिक महानगरपालिकेत वशिल्याने लागलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कामात संथपणा असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. कार्यक्षम, तंत्रस्नेही तरुणांना संधी न दिल्यामुळे कामकाजात दिरंगाई होत असल्याचे बोलले जात आहे.

मार्च ते ऑगस्ट या काळात दरवर्षी मानधन रखडते हे काही नवीन राहिलेले नाही. "हे तर प्रत्येक वर्षीचंच नाटक आहे" असे मत अनेक सेविकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मुलांचे शिक्षण, घरखर्च व रोजची गरज भागवताना महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सध्या नाशिक शहरात सुमारे ६०० अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. यामध्ये विधवा, परित्यक्ता, गरीब व सामाजिक दृष्ट्या दुर्बल महिलांचा समावेश आहे. त्यांचे काम कौतुकास्पद असून त्यांनी ‘लाडकी बहीण योजना’, ‘पल्स पोलिओ मोहिम’ , कोरोना योद्धा म्हणून महिलांनी जीवाची बाजी लावून काम केले आहे. आणि त्यासह अन्य अनेक शासकीय उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे.

प्रशासनाने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या या महिलांना वेळेवर मानधन न मिळणे ही शासकीय उदासीनतेची लक्षणे आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्वरित योग्य पावले उचलून रखडलेले मानधन वितरित करावे, अशी मागणी सेविका व मदतनीस महिलांकडून करण्यात येत आहे.

सोमवार, १४ एप्रिल, २०२५

११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५ - जीवन केशरी
११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५
नाशिकमधील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती!

📝 प्रवेश प्रक्रिया कशी असते?

  • mahahsscboard किंवा संबंधित पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी.
  • भाग 1 व भाग 2 हे दोन्ही फॉर्म भरावे लागतात.
  • फॉर्ममध्ये शाळा, बोर्ड, मार्क्स, कास्ट वगैरे माहिती द्यावी लागते.
  • Merit List (गुणांनुसार यादी) प्रसिद्ध होते – त्यावरून कॉलेज मिळते.
  • प्रवेश मंजूर झाल्यावर कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे आवश्यक.

📑 आवश्यक कागदपत्रे

  • १० वी चे मार्कशीट व उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला (TC)
  • Migration Certificate (जर इतर बोर्ड असेल तर)
  • जात प्रमाणपत्र (OBC/SC/ST साठी)
  • Non-Creamy Layer सर्टिफिकेट (OBC साठी)
  • Aadhar कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो (४-५)

⚖️ Open व OBC वर्गासाठी मार्गदर्शन

  • Open Category: कोणतेही आरक्षण नसल्याने Cut-off ची तयारी करा.
  • OBC Category: योग्य वेळेत Non-Creamy Layer सादर करा.
  • MahaDBT पोर्टलवर शिष्यवृत्ती साठी अर्ज करावा.

📍 नाशिक विद्यार्थ्यांसाठी खास टीप

  • सरकारी महाविद्यालयांसारखे BYK, KTHM, HPT चांगले पर्याय आहेत.
  • सर्व प्रवेश तारखा वेळेत लक्षात ठेवा – अंतीम यादी आणि प्रवेशाची शेवटची तारीख.
  • Polytechnic, ITI किंवा ११ वी – यामधून योग्य पर्याय निवडा.
  • सरकारी योजनांचा फायदा घ्या – मार्गदर्शनासाठी शिक्षकांशी संपर्क ठेवा.
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५ - जीवन केशरी
११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५
नाशिकमधील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती!

📝 प्रवेश प्रक्रिया कशी असते?

  • mahahsscboard किंवा संबंधित पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी.
  • भाग 1 व भाग 2 हे दोन्ही फॉर्म भरावे लागतात.
  • फॉर्ममध्ये शाळा, बोर्ड, मार्क्स, कास्ट वगैरे माहिती द्यावी लागते.
  • Merit List (गुणांनुसार यादी) प्रसिद्ध होते – त्यावरून कॉलेज मिळते.
  • प्रवेश मंजूर झाल्यावर कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे आवश्यक.

📑 आवश्यक कागदपत्रे

  • १० वी चे मार्कशीट व उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला (TC)
  • Migration Certificate (जर इतर बोर्ड असेल तर)
  • जात प्रमाणपत्र (OBC/SC/ST साठी)
  • Non-Creamy Layer सर्टिफिकेट (OBC साठी)
  • Aadhar कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो (४-५)

⚖️ Open व OBC वर्गासाठी मार्गदर्शन

  • Open Category: कोणतेही आरक्षण नसल्याने Cut-off ची तयारी करा.
  • OBC Category: योग्य वेळेत Non-Creamy Layer सादर करा.
  • MahaDBT पोर्टलवर शिष्यवृत्ती साठी अर्ज करावा.

📍 नाशिक विद्यार्थ्यांसाठी खास टीप

  • सरकारी महाविद्यालयांसारखे BYK, KTHM, HPT चांगले पर्याय आहेत.
  • सर्व प्रवेश तारखा वेळेत लक्षात ठेवा – अंतीम यादी आणि प्रवेशाची शेवटची तारीख.
  • Polytechnic, ITI किंवा ११ वी – यामधून योग्य पर्याय निवडा.
  • सरकारी योजनांचा फायदा घ्या – मार्गदर्शनासाठी शिक्षकांशी संपर्क ठेवा.
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी

नाशिक, पंचवटी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांच्या उदय कॉलनी, पंचवटी येथील कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर ॲड. सुरेश आव्हाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य केवळ एका जातीपुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी त्यांचे आयुष्य समर्पित होते."

त्यांनी पुढे सांगितले की, "बाबासाहेबांनी आपल्या संघर्षमय जीवनात अनेक सामाजिक विकृतींवर प्रहार करत, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. त्यांनी समाजातील छुआछूत, वर्णभेद दूर करत स्त्री-पुरुष समानतेसाठी कार्य केले. कायद्याच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले. त्यामुळे आजच्या पिढीने बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून त्यांच्या मार्गाने चालले पाहिजे, हेच त्यांच्या जयंतीचे खरे स्मरण आहे."

या कार्यक्रमात कविता आव्हाड, ॲड. रामचंद्र आहेर, बाळासाहेब मोरे, वसंत ढाकणे, रमेश कुमावत, मनोहर खेडकर, दत्तात्रेय भडांगे, ज्ञानेश्वर गवळी, देवराम बोडके, साहिल खेडकर, श्रीधर खेडकर, अविनाश पानसरे, गौरी लिंगायत, मंगेश सोनार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


रोजच्या अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये आजच सहभागी व्हा:

Join WhatsApp Group

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

नाशिक, पंचवटी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांच्या उदय कॉलनी, पंचवटी येथील कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर ॲड. सुरेश आव्हाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य केवळ एका जातीपुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी त्यांचे आयुष्य समर्पित होते."

त्यांनी पुढे सांगितले की, "बाबासाहेबांनी आपल्या संघर्षमय जीवनात अनेक सामाजिक विकृतींवर प्रहार करत, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. त्यांनी समाजातील छुआछूत, वर्णभेद दूर करत स्त्री-पुरुष समानतेसाठी कार्य केले. कायद्याच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले. त्यामुळे आजच्या पिढीने बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून त्यांच्या मार्गाने चालले पाहिजे, हेच त्यांच्या जयंतीचे खरे स्मरण आहे."

या कार्यक्रमात कविता आव्हाड, ॲड. रामचंद्र आहेर, बाळासाहेब मोरे, वसंत ढाकणे, रमेश कुमावत, मनोहर खेडकर, दत्तात्रेय भडांगे, ज्ञानेश्वर गवळी, देवराम बोडके, साहिल खेडकर, श्रीधर खेडकर, अविनाश पानसरे, गौरी लिंगायत, मंगेश सोनार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


रोजच्या अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये आजच सहभागी व्हा:

Join WhatsApp Group

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

शिवसेना सदस्य नोंदणी मोहिमेला नाशिकमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

जय महाराष्ट्र!

शिवसेना सदस्य नोंदणीसाठी खास लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे:
https://shivsenaconnects.in/rrc?GP2P0

शिवसेनेच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार करणे, युवकांना कार्यक्षमतेने जोडणे, आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणणे. या नोंदणी मोहिमेमुळे पक्षाची गढी अधिक भक्कम होईल, असा विश्वास प्रविण (बंटी) तिदमे, शिवसेना महानगर प्रमुख यांनी व्यक्त केला.

तसेच, शहरातील शिवसैनिक, पदाधिकारी, अंगीकृत संघटना व कार्यकर्ते यांनी घराघरात जाऊन जनतेला या उपक्रमाची माहिती द्यावी व सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत पोहोचावे, असेही त्यांनी सुचवले.

नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी शिवसेनेचे बूथ, स्टॉल्स लावण्यात येत असून तिथे प्रत्यक्ष सदस्य नोंदणीसाठी सुविधा दिली जात आहे. ऑनलाईन व्यतिरिक्त प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या नागरिकांचीही उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचा हा उपक्रम नाशिकमध्ये यशस्वी होत असून लवकरच लाखो सदस्य नोंदणीकृत होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ही सदस्य नोंदणी मोहीम शिवसेना पक्षाच्या भविष्यकालीन उभारणीसाठी एक मजबूत पाया ठरेल.


शिवसेना सदस्य नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा:

WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

शिवसेना सदस्य नोंदणी मोहिमेला नाशिकमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Shiv Sena Logo

जय महाराष्ट्र!

शिवसेना सदस्य नोंदणीसाठी खास लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे:
https://shivsenaconnects.in/rrc?GP2P0

शिवसेनेच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार करणे, युवकांना कार्यक्षमतेने जोडणे, आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणणे. या नोंदणी मोहिमेमुळे पक्षाची गढी अधिक भक्कम होईल, असा विश्वास प्रविण (बंटी) तिदमे, शिवसेना महानगर प्रमुख यांनी व्यक्त केला.

तसेच, शहरातील शिवसैनिक, पदाधिकारी, अंगीकृत संघटना व कार्यकर्ते यांनी घराघरात जाऊन जनतेला या उपक्रमाची माहिती द्यावी व सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत पोहोचावे, असेही त्यांनी सुचवले.

नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी शिवसेनेचे बूथ, स्टॉल्स लावण्यात येत असून तिथे प्रत्यक्ष सदस्य नोंदणीसाठी सुविधा दिली जात आहे. ऑनलाईन व्यतिरिक्त प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या नागरिकांचीही उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचा हा उपक्रम नाशिकमध्ये यशस्वी होत असून लवकरच लाखो सदस्य नोंदणीकृत होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ही सदस्य नोंदणी मोहीम शिवसेना पक्षाच्या भविष्यकालीन उभारणीसाठी एक मजबूत पाया ठरेल.


शिवसेना सदस्य नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा:

WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

गुरुवार, १० एप्रिल, २०२५

Kids Corner - स्मार्टशाळा : मिशन गुप्त कोड

Kids Corner

Kids Cartoon

स्मार्टशाळा – मिशन गुप्त कोड

अर्जुन नावाचा एक हुशार, पण थोडा शांत स्वभावाचा मुलगा होता. तो नेहमी संगणक, कोडिंग आणि रहस्यांची पुस्तकं यामध्ये गुंतलेला असायचा. त्याच्या शाळेत नवीनच एक डिजिटल "स्मार्ट बोर्ड" बसवण्यात आला होता, ज्याचं नियंत्रण मुख्याध्यापकांच्या लॅपटॉपवरून होतं.

पण काही दिवसांनी शाळेत विचित्र घटना घडू लागल्या. वर्गात अचानक projector सुरू व्हायचा, शिक्षिकेचा आवाज robot मध्ये बदलायचा, आणि एकदा तर बोर्डवर एकच वाक्य झळकलं – "माझा कोड सोडव… नाहीतर शिक्षण थांबेल!"

सर्वजण घाबरले. पण अर्जुनच्या डोक्यात काही तरी वेगळंच चालू होतं. त्याने त्या कोडमधलं पहिलं pattern ओळखलं – तो होता binary कोड!

तो लायब्ररीत गेला, जुन्या CCTV फूटेज तपासले, शाळेच्या Wi-Fi चा ट्रॅफिक trace केला… आणि त्याला सापडलं एक नाव – ZEON!

ZEON म्हणजे कोण? बाहेरचा हॅकर? की शाळेतलाच कोणी?

त्याने रात्री शाळेच्या lab मध्ये चोरून प्रवेश केला… आणि तिथं काय पाहतो? एक माणूस hoodie घालून typing करत होता… आणि…

पुढील भागासाठी “Kids Corner” ला भेट देत राहा!

व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करा

११ एप्रिल २०२५ - दैनिक राशीभविष्य | जीवन केशरी

११ एप्रिल २०२५ - दैनिक राशीभविष्य

राशीभविष्य

आज तुमचं नशिब काय सांगतंय? खाली वाचा ताजं मराठी राशीभविष्य सर्व १२ राशींसाठी:

मेष:

आत्मविश्वासाने भरलेला दिवस. महत्त्वाचे निर्णय यशस्वी ठरतील.

वृषभ:

खर्चावर नियंत्रण आवश्यक. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन:

मित्रांशी मतभेद टाळा. आर्थिक लाभ संभवतो.

कर्क:

कामात स्थैर्य येईल. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह:

सामाजिक सन्मान मिळेल. नवीन कामात यश.

कन्या:

निर्णय घेण्यास योग्य वेळ. घरात आनंदाचे वातावरण.

तुळ:

आर्थिक योजना यशस्वी ठरतील. जुने मित्र भेटतील.

वृश्चिक:

मानसिक शांतता लाभेल. प्रवास टाळा.

धनु:

नवीन संधी मिळतील. उत्साह वाढेल.

मकर:

कामात अडथळे येतील. संयम ठेवा.

कुंभ:

व्यावसायिक यश. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

मीन:

आरोग्य उत्तम राहील. मनःशांती अनुभवाल.

आजचा वाढदिवस (११ एप्रिल):

आज जन्मलेले लोक सर्जनशील, आत्मविश्वासी आणि संवेदनशील स्वभावाचे असतात. त्यांच्याकडे नेतृत्वगुण असतात आणि ते कलात्मक क्षेत्रात विशेष यश मिळवू शकतात.
WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
१३०० कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया निविदेचा अहवाल

१३०० कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया निविदेचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश

10 एप्रिल 2025 | नाशिक

नगरविकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नाशिक महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रियेसाठी १३०० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाने नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना या प्रक्रियेची सखोल तपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे या निविदा प्रक्रियेविषयी तक्रार केली होती.

त्यांच्या म्हणण्यानुसार, निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आलेली नाही व विशिष्ट ठेकेदाराला लाभ मिळावा यासाठी इतर ठेकेदारांना समान संधी नाकारण्यात आली आहे.

परवानग्या आणि निधीची शंका

प्रविण तिदमे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ही निविदा प्रक्रिया सुरू करण्याआधी राज्य व केंद्र सरकार, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची परवानगी घेण्यात आली का?

जर या आवश्यक परवानग्या न घेताच प्रक्रिया राबवली गेली असेल, तर केंद्र सरकारकडून निधी बंद होण्याचा धोका असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

नवीन अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

दहावीनंतर काय निवडावे? – कॉलेज की टाय-अप क्लासेस?

दहावीनंतर काय निवडावे? – कॉलेज की टाय-अप क्लासेस?

Verified | विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक
प्रकाशन दिनांक: ८ एप्रिल २०२५

नवीन वाटचाल, पण गोंधळलेली दिशा?

दहावीच्या यशानंतर अनेक विद्यार्थी आणि पालक एकाच प्रश्नासमोर उभे राहतात – कॉलेजमध्येच प्रवेश घ्यावा की टाय-अप क्लासेस निवडावेत? या दोघांमध्ये मोठी गोंधळाची अवस्था निर्माण होते. दोन्ही पर्यायांचे फायदे व तोटे आहेत, पण योग्य निवड करणे अत्यंत गरजेचे आहे.

टाय-अप क्लासेस म्हणजे काय?
काही खासगी क्लासेस विशिष्ट कनिष्ठ महाविद्यालयांसोबत करार करतात आणि दोन्हींचे अभ्यासक्रम एकत्रितपणे विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यामुळे कॉलेजला प्रत्यक्ष जावे लागत नाही; सर्व अभ्यास, मार्गदर्शन आणि प्रवेश प्रक्रिया टाय-अप क्लासद्वारे होते.

कॉलेजचे फायदे:

  • सामाजिक अनुभव, व्यक्तिमत्व विकास
  • शासकीय मान्यताप्राप्त वातावरण
  • क्लासेस, प्रात्यक्षिके, सांस्कृतिक कार्यक्रम
  • स्वतःचे शैक्षणिक टेम्पो तयार करण्याची संधी

टाय-अप क्लासेसचे फायदे:

  • NEET/JEE/CA CET सरावावर जास्त फोकस
  • शिस्तबद्ध आणि वेळेवर लेक्चर्स
  • सुपर स्पेशलायझेशन – फक्त स्पर्धा परीक्षा लक्षात ठेवून अभ्यास
  • पालकांसाठी नियमित फीडबॅक, टेस्ट सिरीज
तोटे कोणते?
टाय-अप क्लासेसमुळे विद्यार्थी कॉलेजचा अनुभव गमावतो. याशिवाय काही टाय-अप क्लासेस फक्त परीक्षांच्या मार्कांवर लक्ष केंद्रित करतात – संपूर्ण बौद्धिक विकास होतोच असे नाही. तर काही कॉलेजेस फारसा मार्गदर्शन न करता विद्यार्थी गोंधळात टाकतात.

तर मग निर्णय कसा घ्यावा?

जर विद्यार्थ्याचा हेतू नीट, जेईई, सीए, एनडीए अशा स्पर्धा परीक्षांची तयारी असेल, तर शिस्तबद्ध टाय-अप क्लासेस उपयुक्त ठरू शकतात – विशेषतः जेथे क्वालिटी फॅकल्टी आणि टेस्ट सिस्टीम आहे. मात्र जर मूल विविध क्षेत्र शोधत असेल, संवाद कौशल्ये, कलात्मकता, सोशल अ‍ॅक्टिव्हिटी अनुभवायची इच्छा असेल, तर कॉलेज हे अधिक योग्य व्यासपीठ ठरू शकते.


तुम्ही काय निवडाल?

खालीलपैकी तुमचा पर्याय निवडा आणि तुमचे मत नोंदवा!

मी कॉलेजला प्राधान्य देईन
टाय-अप क्लासेस माझ्यासाठी योग्य आहेत
अजूनही गोंधळात आहे



College vs Tie-up: थोडक्यात तुलना

घटक कॉलेज टाय-अप क्लासेस
वातावरण मुक्त, संवादात्मक शिस्तबद्ध, स्पर्धात्मक
मार्गदर्शन सामान्य विशेषीकृत
स्पर्धा परीक्षा फोकस कमी जास्त
सोशल अनुभव खूप मर्यादित
फीस कमी ते मध्यम उच्च


तुमचा अनुभव आम्हाला कळवा

तुम्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे की टाय-अप क्लासेस निवडले आहेत? तुमच्या अनुभवातून इतर विद्यार्थ्यांना मदत होऊ शकते. खाली कमेंट करून जरूर शेअर करा!

टीप: तुमचा प्रतिसाद Blogger साठी कॉमेंट सेक्शनमध्ये नोंदवता येईल.

संपूर्ण मार्गदर्शनासाठी भेट द्या – जीवन केशरी मराठी माहिती संकेतस्थळ

शासनाचे पॅट वार्षिक पेपर २०२५ फुटले?

शासनाचे पॅट वार्षिक पेपर २०२५ फुटले?

Verified | तपासलेले वृत्त
प्रकाशन दिनांक: ८ एप्रिल २०२५

शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न!

जीवन केशरी मराठी माहिती संकेतस्थळ

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा पेपर फुटीच्या प्रकारामुळे धक्क्यात आले आहे. शासनाच्या वतीने दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या पीरियॉडिक अस्सेसमेंट टेस्ट (PAT) २०२५ या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याआधीच सोशल मीडियावर लीक झाल्याचे समोर आले आहे.

विशेष बाब म्हणजे, केवळ नववी नव्हे तर पहिली ते नववी इयत्तेपर्यंत सर्वच विषयांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन उपलब्ध झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रश्नपत्रिका लीक होण्यामागे काही यूट्यूब चॅनेल्स आणि स्थानिक व्हाट्सअप ग्रुप्सचा मोठा हात आहे. अनेक शाळांचे व्हाट्सअप ग्रुप्स हे प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात माध्यम ठरत आहेत. त्यामुळे या पेपर लीक घटना केवळ एका शाळेपुरत्या मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर झपाट्याने पसरत आहेत.

या प्रकारावर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) ने तातडीने कारवाई करत यूट्यूब चॅनेल्सवर गुन्हे दाखल केले आहेत. SCERT चे संचालक राहुल रेखावर यांनी स्पष्ट केलं की, परीक्षा मात्र नियोजित वेळेनुसारच होईल आणि प्रश्नपत्रिकांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.

या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. अनेक शिक्षक आणि पालकांनी यावर नाराजी व्यक्त करत, शिक्षण व्यवस्थेच्या गळतीकडे शासनाने गांभीर्याने पाहावे अशी मागणी केली आहे.

शिक्षण क्षेत्रातील विश्वासार्हता आणि पारदर्शकता जपण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत राहील आणि शिक्षण व्यवस्था अधिकच अस्थिर होईल.

संपादित आणि प्रकाशित: जीवन केशरी मराठी | संकेतस्थळासाठी विशेष बातमी

शिक्षण सुधारणा मागण्यांसाठी निवेदन | जीवन केशरी मराठी जीवन केशरी मराठी ...