Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

मंगळवार, ९ मे, २०२३

मुलांसाठी प्रतिबद्ध शाळा कशी असावी?

  ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ मुलांसाठी शाळा निवडतांना ह्या गोष्टी लक्षात घ्या....


      ( प्रातिनिधिक चित्र) 
शिक्षण व शाळा हा आयुष्याचा फार मोठा पाया आहे हा पायाच मजबुत हवा तरच जीवनातील प्रत्येक संघर्षात जिंकली जाते. त्याकरिता चांगली शाळा व चांगले व प्रतिबद्ध शिक्षण गरजेचे आहे. आजकाल प्रत्येक गल्लीबोळात शाळा सरू झाल्या आहेत परंतु प्रत्येक शाळेत काहींना काही तरी अडचणीचा मुलांना नेहमी सामना करावा लागतो. आपल्या मुलांसाठी योग्य शाळेची निवड करावी अन्यथा आपले पाल्य मागे पडून राहतील असे विचार मनाला नेहमी टोचतात. आपण त्यांना ज्या शाळेत शिकायला पाठवतो ती शाळा त्यांच्या दृष्टीने योग्य असणे गरजेचे आहे. काही शाळांमध्ये मुलांना खेळायला मैदानी नाही तरी शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक येतात व जेवणाची सुट्टी झाल्यानंतर मुलांकडून वर्गात व्यायाम करून घेतात यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते व त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. काही शाळांमध्ये काही मुलांना कोणत्याही स्पर्धेत सहभाग घ्यायचा असल्यास ते त्यांना प्रोत्साहन देत नाही . जे मुले दरवेळी स्पर्धेत सहभाग घेतात व बक्षिसे जिंकतात त्यांच मुलांना पुढे करतात असा भेदभाव शाळांमध्ये नसावा. भरपूर अश्या शाळा आहेत ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाईट प्रकारच्या सवयी आहेत. त्या शाळेतील मुले मुलांना मारतात , घरी जात असताना कारण नसतांना धक्का - बुक्की करतात परंतु शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापिक यावर मौन धरतात. काही शाळा मुलांच्या दृष्टीने धक्कादायक बांधकाम आहेत. काही शाळेत नवीन शिक्षिका शिकवण्यासाठी येतात व वह्यांमध्ये  पाहून शिकवतात काही शिक्षिका शिकवण्यासाठी मार्गदर्शक ( गाईड ) चा उपयोग करत नाहीत व योग्य शिकवतात अश्या शिक्षिका दुर्मिळच पाहायला मिळतात. काही शाळांचे वर्ग अदुरूस्त असतात त्यांवर पत्रे असतात यामुळे पावसाळ्यात वरून पाणी गळतीचे प्रमाण जास्त असते व वर्गात पाणी येत असल्याने दमट वास येतो . आता  ऋतू बद्दल काय सांगावे कधी ऊन पडते कधी पाऊस मध्येच थंडी वाजत असते ह्यात जे पत्र्याचे वर्ग आहेत त्यांना उन्हाळ्यात गरमीचा सामना करावा लागतो. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनाकडून शालेय शुल्कांवितिरक्त विविध विषयांकरीता शुल्क आकारले जातात. काही शाळांमध्ये शौचालये साफ केलेले नसतात अशा विविध समस्या काही शाळांमध्ये दिसून येतात यामुळे उन्हाळी सुट्टीत मुलांना विचारपूस करा तुमच्या‌ शाळेतील वातावरण कसे आहे ? शिक्षक चांगले शिक्षक शिकवतात का ? त्यानंतर मुलांना जी शाळा आपल्यासाठी व्यवस्थित व प्रतिबद्ध वाटते त्याच शाळेत त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश करून द्यावा व महत्वाचे म्हणजे शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापिकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे जाण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. त्यांच्यामध्ये भेदभाव करू नये तसेच अप्रगत विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसोबत व मुलांसोबत चर्चा करून प्रगती कशी सुधारता येईल अश्या योजना करायला पाहिजेत.  
आपल्या पाल्याचा योग्य व प्रतिबद्ध त्या विद्यालयात प्रवेश करून देणे ही पालकांची जबाबदारी आहे.


लेखन :- प्रसाद भालेकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

“डिप्लोमा vs १२वी: करिअर की सापळा? महाराष्ट्रातील शिक्षणाचे उघड वास्तव”

Diploma vs 12वी Engineering Admission 2025 | Lateral Entry Seats | Reservation Reality | JKMVS ...