Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

महावितरण नागरीकांच्या संपर्क क्षेत्रातून कायमचे बाहेर ?

 महावितरण नागरीकांच्या 

संपर्क क्षेत्रातून कायमचे बाहेर ? 




महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी, तक्रार करण्यासाठी दिलेल्या तक्रार‌ कम्रांकांवर संपर्क साधल्यास तो अमान्य किंवा संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहेत. महावितरण ज्याप्रकारे पैश्यांचा वसुलीसाठी, थकबाकीकरीत ग्राहकांना सतत फोन करून आठवण करून देते तीच महावितरण विद्युत कंपनी गरजेच्या वेळी ग्राहकांच्या सादेला हाकही देत नाही असे समजते. महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी तक्रार करण्यासाठी २४ तास कार्यरत असणारा नंबर अस्तित्वात आणावा. किंवा काही तांत्रिक कारणांमुळे, अडचणींमुळे जर महावितरणशी संपर्क साधण्यास अडचणी ग्राहकांना येत येणार असेल तर पर्यायी महावितरणने दुसरा संपर्क क्रमांक तात्काळ ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा. अनेकवेळा विनाकारण वीजपुरवठा खंडित होत असतो. अनेकवेळा विनाकारण लोडशेडींग, भारनियमन सुरू केले जाते परंतु ह्याची ग्राहकांना भणकही नसते. जर काही तांत्रिक कारणांमुळे अडचणींमुळे भारनियमन सुरू होणार असेल तर तसे ग्राहकांना संदेशांद्वारे कळवावे जेणेकरून ग्राहकांचे कामे निलंबित राहणार नाहीत असा मुद्दा अनेकवेळा नागरिकांनी उपस्थित केला होता. महावितरणच्या अश्या बेजबाबदार कारभारावर नागरिकांनी सतत प्रश्न उपस्थित केल्याचे दिसते. विद्युत पुरवठा का खंडित करण्यात आला आहे ह्याचे कारण ग्राहकांना कळाले पाहिजे व ग्राहकांचा महावितरणशी जो संपर्क राहायला हवा तो तक्रार क्रमांक बंद पडल्याने तुटलेला आहे.  आता महावितरण नागरीकांच्या संपर्क क्षेत्रातून कायमचे बाहेर पडले की काय असा प्रश्न सध्या नागरिकांना सतावतोय . 

मौजे सुकेणे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनासह रक्षाबंधन उत्साहात

 मौजे सुकेणे विद्यालयात 

राष्ट्रीय क्रीडा दिनासह रक्षाबंधन

 उत्साहात 

विद्यार्थीनी विद्यार्थ्यांना राखी बांधतांना


कसबे सुकेणे( प्रतिनिधी) ता,२९- मौजे सुकेणे ता निफाड येथील मविप्र संचलित कर्म रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज येथे राष्ट्रीय क्रीडा दिनासह रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे,उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे व उपस्थितांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थितांच्या हस्ते पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या वृक्षाला राखी बांधण्यात आली विद्यार्थिनी कु जान्हवी गुरगुडे,कु संध्या हळदे,कु सृष्टी हळदे,कु जागृती पवार यांनी रक्षाबंधन विषयी माहिती करून दिली तर कु हर्षदा गायकवाड,कु सानवी जाधव व शिक्षक अनिल उगले यांनी मेजर ध्यानचंद यांच्या कार्याची ओळख करून दिली यावेळी सर्व विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधत रक्षाबंधन साजरा केला अध्यक्षिय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यामागचा हेतू विशद करत व मेजर ध्यानचंद त्यांचे हॉकी विषयीचे कार्य विशद केले सूत्रसंचालन सातवी अ ची विद्यार्थिनी कु सिद्धी वडघुले व कु अनन्या विधाते यांनी तर आभार कु अनुष्का भोज हिने मानले यावेळी सातवी अ चे विद्यार्थी व त्यांच्या वर्गशिक्षिका श्रीम संगीता थोरात यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्याला गणवेश दिला कार्यक्रमासाठी सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन प्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसंगी प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी ,पर्यवेक्षिका संगीता सोनवणे व आदी


 

एएसव्ही फाउंडेशन मुंबईच्या वतीने मौजे सुकेणेत शैक्षणिक किट वाटप

 एएसव्ही फाउंडेशन मुंबईच्या 

वतीने मौजे सुकेणेत शैक्षणिक 

किट वाटप . 

 ५० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम

एएसव्ही फाउंडेशन घाटकोपर मुंबई स्वयंसेवी संस्थेच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट भेट देण्याप्रसंगी संस्थेचे सदस्य प्राचार्य रायभान दवंगे व आदी


कसबे सुकेणे( प्रतिनिधी) ता,२९- एज्युकेशन सपोर्टस व्हेरियर्स फाउंडेशन घाटकोपर मुंबई या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयातील ५० गरीब, होतकरू व आई किंवा वडील नसलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट भेट देत या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला या कीट मध्ये उत्कृष्ट दर्जाची स्कूल बॅग, बारा स्क्वायर वह्या, दहा पेन, कंपास पेटी, फूटपट्टी, परीक्षेसाठी आवश्यक असलेला पॅड अशी शैक्षणिक किट असलेली बॅग ५० विद्यार्थ्यांना भेट देण्यात आली याप्रसंगी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख बीएमसी अधिकारी हरिबा सोनवणे ,सीबीआय अधिकारी सागर बोरणारे,ज्ञानमंदिर हायस्कूल मुंबईचे संस्थापक अध्यक्ष अनिल झोरे, कसबे सुकेणे येथील मातोश्री क्लिनिकचे संचालक डॉ योगेश भंडारे आदी उपस्थित होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे यांच्या हस्ते अतिथींचे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी स्वयंसेवी संस्थेतील हरिबा सोनवणे,अनिल झोरे व सागर बोरणारे यांनी या स्वयंसेवी संस्थेविषयी माहिती देत आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये जाऊन गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकीतून मदत देत असल्याची माहिती दिली व भविष्यातही गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाईल अशी ग्वाही दिली प्राचार्य दवंगे यांनी या दातृत्वाबद्दल उपस्थितांचे आभार मानत ज्या हेतूने शैक्षणिक मदत करण्यात आली तो हेतू साध्य करून विद्यार्थ्यांनी नावलौकिक वाढवण्याचे आव्हान केले सूत्रसंचालन भारत मोगल यांनी तर उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते

 सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईच्या या स्वयंसेवी संस्थेमध्ये आम्ही जोडले गेले असून समाजातील मागे पडलेल्या घटकांना शैक्षणिक मदत करणे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मदत करत आहोत

 - डॉ योगेश भंडारे, मातोश्री क्लिनिक कसबे सुकेणे

 

गट प्रवर्तक ना राज्य शासनाने कंत्राटी कर्मचारी प्रमाणे शासकीय सेवेत सामावून घ्यावे यासाठी तीव्र लढा उभारणार :- कॉ. राजू देसले

 गट प्रवर्तक ना राज्य शासनाने 

कंत्राटी कर्मचारी प्रमाणे 

शासकीय सेवेत सामावून घ्यावे 

यासाठी तीव्र लढा उभारणार :- 

 कॉ. राजू देसले



 नंदुरबार: राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये गेली १६ वर्ष कार्यरत गट प्रवर्तक ना आरोग्य अभियान मध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी प्रमाणे शासन सेवेत सामावून घ्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन आयटक राज्यभर उभारेल असा इशारा कॉ. राजू देसले राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना आयटक यानी नंदुरबार येथे झालेल्या गट प्रवर्तक आशा मेळाव्यात दिला.

  हॉटेल डी एस के सभागृह नंदुरबार येथे आयटक वतीने गट प्रवर्तक आशा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विचारमंचावर राज्य उपाध्यक्षा वैशाली खंदारे, मनीषा सहासे, गुली पावरा, रत्ना नंदन, मंदाकिनी पाटिल, ललिता माळी, देविदास नरभवरे, संध्या साळवे, रामेश्वरी वसावे, वसंत वाघ आदि उपस्थित होते.

 कोरोना काळात शहीद झालेल्या अंजना देविदास नरभवरे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा कॉ. वैशाली खंदारे यांनी गट प्रवर्तक ना राज्य शासनाने कंत्राटी कर्मचारी प्रमाणे शासकीय सेवेत कायम करावे. उच्चशिक्षित गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे च आम्ही काम करत आहोत. तरी शासनाचे आरोग्य अभियान मध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी दखल घेऊन शासन सेवेत कायम करण्याबत बैठक आयोजित केली होती. त्यात गट प्रवर्तक समावेश नव्हता. हे अंन्यायकारक आहे. त्वरित यात गट प्रवर्तक चा समावेश करावा . अन्यथा तीव्र आंदोलन गट प्रवर्तक करतील असा इशारा दिला. ऑनलाइन ची प्रंचड कामे गट प्रवर्तक वर लादली जात आहेत. मात्र कोणतेही सुविधा दिली जात नाही. त्यामूळे येणाऱ्या काळात बहिष्कार टाकू असा इशारा दिला.

 मेळाव्यात उपास्थित गट प्रवर्तक आशा यांनी समास्य मांडल्या.

 अध्यक्षीय समारोप करताना कॉ. राजू देसले यांनी केंद्र सरकार योजना कर्मचारी चे शोषण करत आहे. उच्चशिक्षित गट प्रवर्तक ना फक्त प्रवास भत्ता देऊन काम करून घेत आहे. हा महीला गट प्रवर्तक चा अवमान केंद्र सरकार करत आहे. कंत्राटी कर्मचारी प्रमाणे शासकीय सेवेत कायम करण्याबाबत राज्य सरकारने गट प्रवर्तक चा समावेश करावा अन्यथा तीव्र आंदोलन राज्यभर होईल. असा इशारा दिला. 

 मेळाव्यात खालिल ठराव संमत करण्यात आले.

१) गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे शासकीय सेवेत कायम करा.

२) गट प्रवर्तक ना शासकीय सेवेत कायम करे पर्यंत कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या. आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी ना शासकीय सेवेत सामावून घेणे बाबत सूरू असलेल्या प्रक्रियेत गट प्रवर्तक समावेश करावा.

३) केंद्र सरकारने २०१९पासून आशा गट प्रवर्तक ना मोबदला वाढ केली नाही. ती करावी. किमान वेतन लागू करा. सामाजिक सुरक्षा लागू करा

४) आशा गट प्रवर्तक ना आँनलाईन ची कामे देऊ नयेत. 

५) दरवर्षी आशा गट प्रवर्तक ना दीपावली ला बोनस द्यावा. 

 आदि ठराव संमत करण्यात आले. या प्रसंगी उषा पावरा, अनिता महिरे, शेवंती मोरे, माधुरी पाटिल, सरला गिरासे, सुमित्रा वसावे, मालती वळवी, प्राजक्ता कापडणे, जेमा वळवी, शीला गावित, मोगी पाडवी , देवकी गावित, रंजना चव्हाण, मंजुळा सोनवणे, लक्ष्मी ठाकरे, अनिता जाधव नंदा राऊत, आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयटक राज्यव्यापी जनजागरण यात्रा कामगार कर्मचारी धोरण विरोधात नंदुरबार जिल्हा येथे आल्यावर यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले.

सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

मौजे सुकेणेतील चिमुकले गुंतले राखी कार्यशाळेत

 मौजे सुकेणेतील चिमुकले 

गुंतले राखी कार्यशाळेत 

 तयार राख्या पाठवणार अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना ! 

 मौजे सुकेणे अभिनव विद्यालयातील विद्यार्थी गुंतले राखी कार्यशाळेत तर दुसऱ्या छायाचित्रात तयार राखी दाखवताना विद्यार्थी








कसबे सुकेणे ता,२८- मराठा विद्या प्रसारक संचालित अभिनव बाल विकास मंदिर मौजे सुकेणे ता,निफाड या विद्यालयातील चिमुकले राखी कार्यशाळेसाठी इतके गुंग झाले होते की जणू आपण शाळेत आहोत की नाही हे देखील विसरून गेले येथील अभिनव विद्यालयात राखी बनवणे कार्यशाळा प्राचार्य रायभान दवंगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली .या कार्यशाळेसाठी इयत्ता पहिली ते चौथीच्या एकूण १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या कार्यशाळेसाठी दोन गट करण्यात आले पहिली ते दुसरीचा एक गट तर तिसरी ते चौथीचा दुसरा गट तयार करून स्पर्धा घेण्यात आले दोन्ही गटातील अनुक्रमे दोन नंबर काढण्यात आले. तयार झालेल्या राख्या अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना पाठविण्याचा मानस शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी बोलून दाखवला असून सदर राख्या अनाथ आश्रमात पाठवण्यात येणार आहे सुरुवातीला या विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांनी राखी कशा प्रकारे तयार करावी याविषयी मार्गदर्शन केले ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे ,प्रियंका खुळे, कावेरी देशमुख, राहुल मोगल, वर्षा चौधरी, प्रियंका मोगल, जाधव मॅडम,राणी साबळे, संगीता पगारे , पुष्पा पगारे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडली.



 अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या सहकार्याने लहान विद्यार्थ्यांमध्ये रक्षाबंधन सणाचे महत्व लक्षात यावे व बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी हा स्तुत्य उपक्रम असून तयार झालेल्या राख्या अनाथांना पाठवण्यात येत आहे

- श्री. रायभान दवंगे,  प्राचार्य मौजे सुकेणे

 

आयटक संघटनेचा उत्तर महाराष्ट्र मेळावा २७ ला संपन्न

 



आयटक संघटनेचा उत्तर 

महाराष्ट्र मेळावा २७ ला संपन्न 

 नाशिक: आयटक  संलग्न कामगार कर्मचारी संघटना चा उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा द्वारका नाशिक येथे  कॉ. दत्ता देशमुख सभागृह खरबंदा पार्क येथे पार पडला. सदर मेळावा केंद्र व राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी धोरणांच्या विरोधात एल्गार पुकारून त्याविरोधात आयोजलेल्या जनजागरण यात्रेच्या नियोजन करण्यासाठी सदर मेळावा आयोजित केला  होता. मेळाव्यात नाशिक, अहमदनगर,नंदुरबार,धुळे, जळगाव जिल्ह्यातून सर्व संघटना, घटक संघटना,  आयटक संलग्न संघटना व फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर मेळाव्याचे अध्यक्ष  जेष्ठ विज कामगार आयटक नेते कॉम्रेड व्ही. डी. धनवटे होते तर प्रमुख मार्गदर्शक  आयटकच्या राष्ट्रीय सचिव कॉम्रेड बबली रावत यांनी मार्गदर्शन केले .  आयटक राज्य सचिव कॉ. राजू देसले, राष्ट्रीय बिडी कामगार नेते कॉ.कारभारी उगले,आयटक राज्य सचिव कॉ. सुधीर टोकेकर , उपाध्यक्ष कॉ. अमृत महाजन, कॉ.सखाराम दुर्गुडे, कॉ.नामदेव बोराडे, कॉ. वैशाली खंदारे,  एस . खातिब ,हसीना शेख, माया घोलप, दत्तू तुपे भिका बांडे , राजेंद्र चौधरी, असे विविध संघटनेचे पदाधिकारी  मंचावर उपस्थित होते. यावेळी प्रगतिशील लेखक संघाच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड झाल्याबद्दल लेखक राकेश वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच घरेलू कामगार संघटनेच्या पदाधिकारी कॉ.मीनाताई आढाव यांची कन्या काजल आढाव यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण करून ज्युनियर इंजिनियर म्हणून विद्युत खात्यात नेमणूक झाल्याबद्दल आयटक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.  तसेच महाराष्ट्र राज्य  कामगार कर्मचारी संघटना कृती समिती च्या राज्य सह निमंत्रक पदी कॉ. राजू देसले यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सदर मेळावा आयटक महाराष्ट्राच्या वतीने राज्यात २० नोव्हेंबर २०२३  पासून कोल्हापूर येथून आयटक महाराष्ट्र वतीने  केन्द्र व राज्य शासनाच्या कामगार कर्मचारी धोरण विरोधात २० डिसेंबर २०२३ दरम्यान  राज्यव्यापी  जनजागरण यात्रा निघणार असून सदर यात्रा कोल्हापूर पासून सुरू होऊन नागपूरला समारोप होणार आहे. हि यात्रा उत्तर महाराष्ट्र प्रवेश केल्यावर  भव्य स्वरूपात स्वागत करून मोहिम यशस्वी करावी असे आवाहन आयटक राष्ट्रिय सचिव कॉ. बबली रावत यांनी केले. केंद्र सरकार कामगार विरोधी धोरण राबवत आहे. योजना कर्मचारी आशा, गट प्रवर्तक, अंगणवाडी, अंशकालीन स्री परिचर , उमेद, ग्राम रोजगार सेवक , आदींचे शोषण करत आहे. मणिपूर महिला अत्याचार  बाबत पंतप्रधान बोलत नाही. नवीन कामगार कायदे लागू झाले तर कामगार ना संघटित करणे कठीण होनार आहे. इपिएस 95 पेन्शनर 9हजार रूपये पेन्शन महागाई भत्ता सह लागू करा यासाठी आंदोलन करतं आहे. कंत्राटी पद्धतीने शोषण सुरू आहे. वीज, बँक, विमा उद्योग खाजगीकरण करून विकण्याचे काम सुरु आहे. या विरोधात देशभर आयटक लढत आहे. महाराष्ट्र  आयटक वतीने 20नोव्हेंबर पासुन कोल्हापूर ते नागपूर राज्य व्यापी कामगार कर्मचारी धोरण विरोधात एल्गार पुकारला जाणार आहे. व नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात वर 1लाख चा भव्य मोर्चा व्हावा यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले.  2024 शेतकरी कामगार विरोधी, महागाई वाढवणारे,भाजप सरकारचा पराभव करावा असे आवाहन केले बबली रावत यांनी केले.

  मेळाव्याचे प्रास्तविक राजू देसले यांनी केले. उत्तरं महाराष्ट् त आयटक संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. जनजागरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन केले.  मेळाव्याचे अध्यक्ष  धनवटे वि डी यांनी आयटक संगठना गेली 103  वर्ष  संघर्ष करित आहे. गाव तिथे आयटक चे सभासद आहेत. त्यामुळें यात्रेचे स्वागत जोरदार होईल. व्यापक जन जागृती साठी आजपासून सुरुवात करु या. सर्व संघटना नी तन मन धनाने सहभागी व्हावे असे आवाहन केले.

 मेळाव्यात खालील ठराव संमत करण्यात आले.

  1.  कामगार विरोधी केंद्र सरकारने ४ केलेले मागे घ्यावेत
  2. कांदा निर्यात शुल्क ४० टक्के निर्णय रद्द करावा.
  3.  मणिपूर महिला अत्याचार  चा निषेध
  4.   आशा, गट प्रवर्तक,  अंगणवाडी कर्मचारी, अंशकालीन स्री परिचर, उमेद, ग्राम रोजगार सेवक, शालेय पोषण आहार योजना कर्मचारी, कंत्राटी नर्सेस कर्मचारी  आदींना शासकीय कर्मचारी दर्जा द्या.
  5.  गट प्रवर्तक ना राज्य शासकीय कर्मचारी दर्जा द्या. आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी ना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत  सुरू असलेल्या प्रक्रियेत गट प्रवर्तक चा समावेश करावा.
  6. कंत्राटी कामगार, योजना कर्मचारी ना दीपावली ला बोनस दया.
  7.  इ पी एस ९५पेंशनर्स ना ९हजार रूपये महागाई भत्ता सह पेन्शन लागू करा.
  8. ग्राम पंचायत कर्मचारी ना यावलकर समिती शिफारस लागू करा. पेन्शन द्या. जीप कर्मचारी दर्जा द्या
  9. वीज, बँक, विमा उद्योग चे खाजगीकरण थांबवा.
  10. जात, धर्म नावावर हिंसाचार थाबवा
  11. शेतकरी कामगार विरोधी धोरण रद्द करा
  12. विडी कामगार ना किमान वेतन लागू करा. राज्य शासनाने  भत्ता द्यावा.
  13. बांधकाम कामगार, घरेलु कामगार मंडळासाठी पुर्ण वेळ कर्मचारी दया. कामगार विभागातील अधिकारी कर्मचारी रिक्त जागा त्वरित भरा.

 आदि ठराव करण्यात आले.

 मेळाव्यात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. . या प्रसंगी सुनिता कुलकर्णी, रेणुका वंजारी , सुरेखा खैरनार, चित्रा जगताप,  सुरेश पानसरे, निवृत्ती दातीर,  शिवराम रसाळ, भाऊसाहेब शिंदे , उषा अडांगळे,  आदींनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात  सिता शेलके,  जयश्री गुरव, बाळू ढाकणे, राजेन्द्र जाधव, मंदाकिनी पाटिल, संगीता बिरारे, प्रकाश शिंदे आदि उपस्थित होते. सूत्र संचलन भीमा पाटील यांनी केले. आभर  दत्तू तुपे यांनी मानले.

शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत गटप्रवर्तक यांना शासन सेवेत नियमित पदावर थेट समायोजन करणे बाबत. बैठक आरोग्य मंत्र्या सोबत करणार - खा. गोडसे यांचे आश्वासन

 राष्ट्रीय आरोग्य अभियाना 

अंतर्गत कार्यरत गटप्रवर्तक 

यांना शासन सेवेत नियमित 

पदावर थेट समायोजन करणे

 बाबत बैठक आरोग्यमंत्र्यांसोबत करणार - खा. गोडसे यांचे आश्वासन 




 नाशिक: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी शासन सेवेत नियमित पदावर थेट समायोजन करणे बाबत बैठक दिनांक 18/8/2023 या. मा. मंत्री महोदय, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांचे मंत्रालयीन दालन मुख्य इमारत मंत्रालय मुंबई येथे झाली. मात्र गट प्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचारी पद्धतीने ऑर्डर असताना हि कंत्राटी कर्मचारी समावेश नाही. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गटप्रवर्तक(B.F) सुपरवायझर २००८ पासून कंत्राटी म्हणून ऑर्डर मिळाली होती व कार्यरत आहे कंत्राटी कर्मचारी म्हणून दैनंदिन कामकाज करीत आहे. तरी शासनाने याची दखल घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचारी यांना शासन सेवक नियमित पदावर थेट समयोजन करणे बाबतच्या बैठकीत गटप्रवर्तकांचा समावेश करून उच्च शिक्षित गटप्रवर्तकांना न्याय द्यावा अशी मागणी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटना व वतिने खा . हेमंत गोडसे यांच्या कडे निवेदन व्दारे गट प्रवर्तक संघटना राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले यांनी केली. खा. गोडसे यांनी गट प्रवर्तक चा समावेश त्वरीत कंत्राटी कर्मचारी म्हणून व्हावा. व सर्व लाभ त्वरित द्यावेत या संदर्भात मा. आरोग्य मंत्री व मुख्यमंत्री समवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. उच्च शिक्षित गट प्रवर्तक महीला वर होत असलेल्या अन्याय बाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले . या प्रसंगी गट प्रवर्तक आयटक च्या प्रतिभा कर्डक, सुवर्णा लोहकरे, मनीषा खैरनार, रुपाली सानप, सारिका घेगडमाल, साबळे एस, संगीता गांगुर्डे, एस. उगले आदि गट प्रवर्तक उपस्थित होते.

“डिप्लोमा vs १२वी: करिअर की सापळा? महाराष्ट्रातील शिक्षणाचे उघड वास्तव”

Diploma vs 12वी Engineering Admission 2025 | Lateral Entry Seats | Reservation Reality | JKMVS ...