Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

महावितरण नागरीकांच्या संपर्क क्षेत्रातून कायमचे बाहेर ?

 महावितरण नागरीकांच्या 

संपर्क क्षेत्रातून कायमचे बाहेर ? 




महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी, तक्रार करण्यासाठी दिलेल्या तक्रार‌ कम्रांकांवर संपर्क साधल्यास तो अमान्य किंवा संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहेत. महावितरण ज्याप्रकारे पैश्यांचा वसुलीसाठी, थकबाकीकरीत ग्राहकांना सतत फोन करून आठवण करून देते तीच महावितरण विद्युत कंपनी गरजेच्या वेळी ग्राहकांच्या सादेला हाकही देत नाही असे समजते. महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी तक्रार करण्यासाठी २४ तास कार्यरत असणारा नंबर अस्तित्वात आणावा. किंवा काही तांत्रिक कारणांमुळे, अडचणींमुळे जर महावितरणशी संपर्क साधण्यास अडचणी ग्राहकांना येत येणार असेल तर पर्यायी महावितरणने दुसरा संपर्क क्रमांक तात्काळ ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा. अनेकवेळा विनाकारण वीजपुरवठा खंडित होत असतो. अनेकवेळा विनाकारण लोडशेडींग, भारनियमन सुरू केले जाते परंतु ह्याची ग्राहकांना भणकही नसते. जर काही तांत्रिक कारणांमुळे अडचणींमुळे भारनियमन सुरू होणार असेल तर तसे ग्राहकांना संदेशांद्वारे कळवावे जेणेकरून ग्राहकांचे कामे निलंबित राहणार नाहीत असा मुद्दा अनेकवेळा नागरिकांनी उपस्थित केला होता. महावितरणच्या अश्या बेजबाबदार कारभारावर नागरिकांनी सतत प्रश्न उपस्थित केल्याचे दिसते. विद्युत पुरवठा का खंडित करण्यात आला आहे ह्याचे कारण ग्राहकांना कळाले पाहिजे व ग्राहकांचा महावितरणशी जो संपर्क राहायला हवा तो तक्रार क्रमांक बंद पडल्याने तुटलेला आहे.  आता महावितरण नागरीकांच्या संपर्क क्षेत्रातून कायमचे बाहेर पडले की काय असा प्रश्न सध्या नागरिकांना सतावतोय . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

“डिप्लोमा vs १२वी: करिअर की सापळा? महाराष्ट्रातील शिक्षणाचे उघड वास्तव”

Diploma vs 12वी Engineering Admission 2025 | Lateral Entry Seats | Reservation Reality | JKMVS ...