Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

सोमवार, २७ मे, २०२४

 १० वी बोर्डाच्या परीक्षेत जनता विद्यालयाचा १०० % निकाल ! 

विद्यार्थी ठरले उत्कृष्ट गुणवत्तेचे शिलेदार 

Image By:- Prasad Bhalekar, AI. 



नाशिक: मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता विद्यालय गोरेराम लेन येथील इयत्ता १० वी मार्च २०२४ चा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाचा शेकडा निकाल १००% लागला असून परीक्षेला एकूण प्रविष्ट विद्यार्थी-१२२

पास विद्यार्थी-१२२ , विशेष श्रेणी -९० , प्रथम श्रेणी -३० , द्वितीय श्रेणी -२ 

मार्च २०२४ परीक्षेत विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी-

 1) हर्षिता प्रशांत शेलार - ९६.४०


2) प्रियंका नंदकिशोर शेळके - ९५.८०


3) वैष्णवी प्रताप गायकवाड - ९४.६० 


4) कलश रामेश्वर कदम -९३.८० 


5) पायल पंडित कालेकर - ९३.२०

अशी गुणवत्तेच्या शिलेदारांची उत्कृष्ट टक्केवारी आहे. ह्या

गुणवंत विद्यार्थ्यांचे मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती श्री. बाळासाहेब क्षिरसागर, शालेय समितीचे अध्यक्ष श्री.रावसाहेब मोरे, व सर्व शालेय समिती सदस्य व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.एम.एस. डोखळे व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

रविवार, २६ मे, २०२४

महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान तर्फे जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन

 




महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान तर्फे जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन

     महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान ह्या नोंदणीकृत सांस्कृतिक संस्थेच्या वतीने नाशिक जिल्हास्तरीय खुली

१) लोकगीत गायन स्पर्धा(एकल व सांघिक)

२) पोवाडा गायन स्पर्धा (एकल व सांघिक)  

३) काव्यलेखन स्पर्धां (खुली/एकल)


 इ .स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सांघिक स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क नाममात्र रु.१००/- असून एकल स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क रू.२०/- तर काव्य लेखन स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क रु.५०/- ठेवण्यात आलेले आहे.


सांघिक स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु.१०००/- ;द्वितीय रू.७००/- ; तृतीय रू.५००/- असून एकल स्पर्धेसाठी पारितोषिक प्रथम रू.४००/- , द्वितीय रू.३००/-, तृतीय रू.२००/- असून स्पर्धेतील सहभागी सर्व कलावंतांना/स्पर्धकांना प्रशस्तीपत्र प्रदान केले जाणार आहे.

   नाव नोंदणी,स्पर्धेच्या अटी,नियम साठी तसेच कविता पाठविण्यासाठी सरचिटणीस अशोक भालेराव,प्रेस कॉलनी,गांधीनगर नाशिक-६ ह्या पत्यावर (मो.नं.९२२६० ३२८९८) किंवा जिल्हा सचिव मनोहर नेटावटे मो.नं.९७६७५२१०५० यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थाध्यक्ष शा.

सुरेशचंद्र आहेर,उपाध्यक्ष उत्तम गायकर,कोषाध्यक्ष अनिल मनोहर, जिल्हाध्यक्ष संपत खैरे,श्रीकांत श्रावण,

रेखा महाजन,देवचंद महाले,राजेंद्र वावधने इ.नी केले आहे.

बुधवार, २२ मे, २०२४

 मौजे सुकेणे  महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के

 विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम 



कसबे सुकेणे प्रतिनिधी ता,२१- मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात कनिष्ठ महाविद्यालय मौजे सुकेणे ता,निफाड विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयाने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे विद्यालयात विज्ञान शाखेत एकूण परीक्षेस ५५ विद्यार्थी बसले होते त्यापैकी विशेष श्रेणीत २,अ श्रेणीत २३, ब श्रेणीत ३०, विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला विद्यालयात अनुक्रमे पहिले पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे (१) रसिका ढगे ८१.१७% (२) अदिती मोरे ७५.५०%(३) सानिया पिंजारी ६९.८३ % (४) रिया भोज ६९.५० % (५) ऋतिका मोगल व आदित्य शेवकर ६६ % गुण मिळवत उत्तीर्ण झाले तर कला शाखेचा निकाल ९६.१९ % लागला असून परीक्षेत १०५ त्यांपैकी १०१ विद्यार्थी परीक्षेत पास झाले त्यापैकी विशेष श्रेणीत २, अ श्रेणीत ३२, ब श्रेणीत ६५ तर क श्रेणी २,विद्यार्थी पास झाले कला शाखेतील पहिले पाच विद्यार्थी पुढील (१) रोहिणी सताळे ८०.५०(२) प्रियंका चौधरी ७८.५०(३) कोमल कडाळे ७१.६७(४) सिद्धी कातकाडे व शितल गव्हाणे ७०..५०(५) श्रुती उशिर व पायल गांगुर्डे ६७.३३ टक्के

 गुण मिळवत उत्तीर्ण झाले.



 यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र संस्थेचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती देवराम मोगल, तालुका संचालक शिवाजी पाटील गडाख, प्राचार्य रायभान दवंगे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष अतुल भंडारे, मोतीराम जाधव, उपप्राचार्य अनिल परदेशी पर्यवेक्षक नितीन भामरे ,कला विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे, विज्ञान प्रमुख प्रा सचिन भंडारे सर्व स्कूल कमिटी सदस्य व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले यशस्वी विद्यार्थ्यांना सर्व प्राध्यापक वर्गांचे मार्गदर्शन लाभले.

रविवार, १९ मे, २०२४

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी लेख!

 शिक्षणाचे महत्त्व : राष्ट्रहिताचे सुवर्ण स्वप्न !

Image By :- Prasad Bhalekar, Ai Art . 


“शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे . जो ते प्राशन करेल तो दहाडल्या शिवाय राहणार नाही ! ” हे उद्गार शिक्षणाचे अमृत प्राशन केलेले महामानव व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे आहे. आणि ते उद्गार अगदी सोन्यासम खरे आहे. “ शिक्षण ” ही एक अशी गोष्ट आहे जी अशक्यास शक्य करण्याची ताकद ठेवते . रंकाला राजा करण्याची शक्ती ह्या शिक्षणात आहे. शिक्षण हे एका अमृताहूनही श्रेष्ठ आहे. कारण , ज्याने योग्य शिक्षण घेतले त्या व्यक्तीला आयुष्यात कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही. परंतु ह्या अमृताचे प्राशन करण्याची आणि त्याचा लाभ घेण्याची क्षमता क्षणिक लोकांकडेच असते. आणि ज्या व्यक्तीला हे शिक्षणाचा लाभ घेता आला त्याचे जीवन सार्थक झालेच म्हणून समजा...! . आयुष्यात कोणतीही गोष्ट असो तिला प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे जिद्द असायला हवी आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची ताकद आणि तयारी असणे गरजेचे आहे तरच ती गोष्ट आपल्या पदरात पडते. ह्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक सर्वोत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यांची शिक्षण घेण्याबद्दलची जिद्द , चिकाटी फार अतुलनीय आणि सर्वश्रेष्ठ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे २८ पदव्या आहेत. त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे आज भारत देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात त्यांच्या कर्तृत्वाची गाथा गायली जाते . असे अनेक धुरंधर आहे आपल्या भारत देशाचे ११ वे महान राष्ट्रपती , वैज्ञानिक मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सर. त्यांनी शिक्षण घेण्यासाठी अपार कष्ट केले आहे. त्यांनी शिक्षण घेण्यासाठी सायकल वरून जाऊन घरोघरी सकाळी सकाळी पेपर पोहचवत नंतर ते आपल्या शाळेत शिकण्यासाठी जात‌ . कलाम सर हे रामेश्वरम येथे राहत असत आणि त्यांचे विद्यालय रामनाथपुरम येथे होते. श्र्वार्ट्झ हायस्कूलमध्ये ते शिक्षण घेत होते. त्यांच्या घरापासून ते शाळेपर्यंतचे अंतर हे १५ किलोमीटर अंतर होते. त्यामुळे ह्या सर्व लोकांना शिक्षणाची किंमत आहे. कारण , त्यांनी जिद्दीने शिक्षण घेऊन यशाची गळाभेट घेतली आहे. 

  एकदा डॉ. ए.पी.जे . अब्दुल कलाम सर ह्यांची आणि युवा उद्योजक श्री. श्रीकांत बोला ह्यांची पहिल्यांदा जेव्हा विद्यालयात भेट झाली तेव्हा त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना जेव्हा प्रश्न विचारला की “तुमचे सर्वोच्च स्वप्न काय आहे” तेव्हा श्रीकांत बोला हयाने उत्तर दिले की मी एका मोठा उद्योजक होणार आहे आणि अंध व्यक्तींसाठी रोजगार उपलब्ध करून देणार आहे. श्रीकांत हे एक अंध व्यक्ती आहे त्यांना शिकण्यासाठी अनेक कष्टांचा सामना करावा लागला. कॉलेजने त्यांना सायन्स विषय देण्यासाठी मनाई केली होती ह्यावेळी त्यांनी न्यायासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती व त्याने न्यायालयात अंध विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी केलेल्या व्यक्तव्यानंतर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांना तेथे सायन्स ला प्रवेश मिळाला. यामुळे त्यांना सुध्दा शिक्षणाची जाणीव आहे. तेही अंध होते पण त्यांनी हार न मानता शिक्षणासाठी झटले आणि ह्यामागे त्यांच्या शिक्षिका देविका भुयान  ह्यांनी त्यांना साथ दिली . ह्यानंतर त्यांनी अंध व्यक्तींसाठी एक उद्योग निर्माण करण्याचे ठरविले ह्यासाठी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. कलाम सर ह्यांची व त्यांचे मित्र ह्यांची त्यांना मदत झाली. शिक्षण ही गोष्टच निराळी आहे ज्याला मिळाली तो व्यक्ती पावन होतोच पण ते शिक्षण घेण्यासाठी जिद्द आणि काहीतरी करुन दाखविण्यासाठी आपल्याला प्रेरणास्त्रोत असणे गरजेचे आहे. हे सर्व व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम, श्रीकांत बोला आणि इतर अनेक ज्ञात - अज्ञात व्यक्ती ह्यांच्याकडे जिद्द होती आणि त्या जिद्दीमुळेच त्यांचे नाव आज विश्वात अभिमानाने झळकत आहेत. नुकताच १० मे २०२४ रोजी श्रीकांत बोला ह्यांच्या संघर्षमयी जीवनावर चित्रपटही प्रदर्शित करण्यात आला असून तो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. 


  यांशिवाय क्रांतिसुर्य महात्मा फुले, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले ह्या सर्व महान व्यक्तींचे शिक्षण दानासाठी अनमोल योगदान आहे. शाहू महाराज ह्यांनी सुध्दा कोल्हापुरात अनेक शाळां सुरू केल्या . ह्यानंतर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांना अमेरिका येथे उच्च शिक्षणासाठीचा संपूर्ण खर्च त्यांनी केला होता. सयाजीरावांनी कोलांबिया येथील विद्यापीठात शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती प्रदान केली होती. तसेच क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांचे कार्य तर अवघे विश्व जाणून आहे. मुलींना शिक्षण मिळावे यासाठी किती प्रयत्न केले. पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. ह्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. १९१४ ला नाशिक येथे कर्मवीर रावसाहेब थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून मराठा विद्या प्रसारक समाज ही एक शैक्षणिक संस्था स्थापन केली . संस्थेचा उद्देश मराठा समाज आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे . विद्यार्थ्यांना व्यावसायिक व तंत्रशिक्षण दिले जाते. यानंतर १९१९ ला भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊराव पाटील यांनी "कमवा आणि शिका" ही संकल्पना राबवली. यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेनंतर श्रम करून पैसे कमवायचे आणि त्यातून शिक्षणाचा खर्च भागवायचा होता. यामुळे विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरता आणि श्रमाचा आदर शिकायला मिळाला. त्यांनी महिलांच्या शिक्षणालाही खूप महत्त्व दिले. त्यांच्या मते, स्त्रीशिक्षण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. 

  भारतातील सद्यस्थिती पाहता शिक्षण हाच एकमेव असा राजमार्ग आहे की जो भारतात चाललेल्या दडपशाहीला , अन्यायाला आळा घालण्यासाठी मदत करेल. आणि भारत देशाला एका उच्च शिक्षित, लढाऊ आणि निर्भिड युवा नेतृत्वाची भारताला गरज आहे की जे नेतृत्व देशाला सामाजिक, आर्थिक, बौद्धिक, शैक्षणिक अश्या सर्व दृष्टीने सांभाळून ठेवू शकेल आणि देशाला खऱ्याखुऱ्या रूपाने विकसित बनवेल. राजकारण न करता समाजकारण करेल आणि पक्ष सोडण्यापेक्षा आपला स्वार्थ सोडून देशाच्या हितासाठी काम करेल. ह्या शिक्षणानेच राष्ट्रहिताचे सुवर्ण स्वप्न साकार होईल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही....!!!!! 


लेखक व माहिती संकलन: प्रसाद भालेकर, विद्यार्थी प्रतिनिधी, नाशिक शहर 

संचालक - जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेल, नाशिक 

मो. ९५२९१९५६८८ | E-mail ID :  jivankeshrimarathi@gmail.com


 

शुक्रवार, १७ मे, २०२४

नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये हेमंत गोडसे करणार हॅट्रिक ?

 नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये हेमंत गोडसे करणार हॅट्रिक ?

नाशिकमध्ये गोडसे व वाजेंची लढत रंगणार ! 

(संग्रहित छायाचित्र ) 


नाशिक :- नाशिक लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण महाराष्ट्रात नाहीतर  राजकरणातील देशाचा केंद्रस्थान बनला होता. महाविकास आघाडी कडून 48 ते 50 दिवसा अगोदरच उमेदवार जाहीर झाला होता तर महायुतीचा उमेदवार अतिशय उशिरा जाहीर झाला, यामुळे मोठ्या प्रमाणात महायुतीला फटका बसेल असं अनेकांचे मत होतं ; परंतु विद्यमान खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांचा पक्षापलीकडचे संबंध व त्यांनी या दहा वर्षांमध्ये निर्माण केलेला दांडगा जनसंपर्क याच्यामुळे त्यांना ही लढत सोपी जात असतानात दिसत आहे. त्यांचा अतिशय शांत आणि संयमी स्वभावामुळे त्यांचा जनतेशी अतिशय तळागाळापर्यंत नाळ जोडली गेली आहे. कोरोना काळामध्ये हेमंत गोडसे यांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्यांचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक देशात सहावा क्रमांक आला होता, हेच नाशिकच्या जनतेने लक्षात घेता त्यांची उमेदवारी जाहीर होताच मोठ्या मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आलं. मध्यंतरी राजाभाऊ वाजे यांनी स्वतः मागच्या पंचवार्षिक निवडणुकी वेळी खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांनी 50% पेक्षा जास्त निधी हा सिन्नरमध्ये दिल्याचं कबुली दिल्याची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. राजाभाऊ वाजेंच होम ग्राऊंड मानल जाणाऱ्या सिन्नरमध्ये गोडसे यांनी सिन्नरमध्ये भरघोस निधी वाटप केल्यामुळे त्यांना सिन्नर मध्ये सुद्धा महाप्रचंड असा प्रतिसाद भेटत आहे. 

महाराष्ट्र राज्यातील पहिली तर देशातील तिसरी टेस्टिंग लॅब , केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 26000 परिवारांसाठी म्हणजेच एक लाख सहा हजारहून अधिक नाशिककरांसाठी त्यांनी सीजीएचएस सेंटर बांधले, कसंशील मला जाणाऱ्या नाशिक मध्ये यूपीएससी, एमपीएससी आणि नीट चे सेंटर नव्हते ते त्यांनी नाशिकमध्ये आणले, ९ वर्षापासून बंद पडलेल्या नाशिक साखर कारखाना त्यांनी शेतकऱ्यांसाठी चालू करून 16000 शेतकऱ्यांना त्यांनी नवसंजीवनी दिली, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रेल्वे चाक निर्मिती कारखान्याला त्यांनी गती दिली, मधील वाहतूक कोंडी आणि अपघात थांबवण्यासाठी जत्रा हॉटेल ते केके वाघ पर्यंतचा उड्डाणपूल बांधून तो कार्यान्वित देखील केला, पतीचे शेकडो कामांचा कार्य अहवाल त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवल्यामुळे त्यांचं पारडं जड दिसत आहे. ताई येत्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानाचा निकाल हा चार जून रोजी लागणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये चालू असलेल्या रणधुमाळी अंतिम निर्णय काय लागतो ते बघणं रोमांचक ठरणार आहे.

शनिवार, ११ मे, २०२४

 २६ मे पासून ऑनलाईन एआय स्किल प्रशिक्षण शिबिराला होणार सुरूवात 

( By :- Prasad Bhalekar, Ai ) 




नाशिक:- आत्ताचे युग हे अत्यंत स्पर्धेचे आहे व डिजिटल झाले आहे त्यामुळे त्या युगाबरोबर आपण चालणे गरजेचे आहे. ह्याच पाश्र्वभूमीवर जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेल तर्फे AI व इतर विविध डिजिटल स्किलचे ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या प्रशिक्षण शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना Chat Gpt, Bing, Google Gemini व अश्या विविध एआय सोफ्टवेअरची तोंडओळख तसेच त्यांचा वापर ह्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. इमेल आयडी बनविणे, ब्लॉगर ह्या प्लॅटफॉर्मचीही तोंडओळख तसेच त्यांच्या यंत्रणेचे स्पष्टीकरणासहीत प्रात्यक्षिक ऑनलाईन प्रशिक्षणामार्फत दाखविले जाणार आहे. ह्या प्रशिक्षण शिबिरामध्ये १३ वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविता येणार आहे. प्रशिक्षण शिबिरामधील घटक शिकवून झाल्यानंतर शिकवलेल्या घटकांवर ५० गुणांची प्रात्यक्षिक व ५० मार्कांची ऑनलाईन टेस्ट अशी एकूण १०० गुणांची ऑनलाईनरीत्या परीक्षा घेण्यात येणार आहे. व त्यानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र तसेच प्रथम तीन क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र+ पदक ( मेडल ) देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी २६ मे २०२४ ते ५ जून २०२४ ह्या कालावधीत होणार असून नावनोंदणीची शेवटची मुदत २२ मे २०२४ अशी आहे. अधिक माहितीसाठी मो. ९५२९१९५६८८ किंवा इमेल आयडी: jivankeshrimarathi@gmail.com ह्यावर संपर्क साधावा असे आवाहन प्रशिक्षणाच्या आयोजकांनी केले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रत्येकी १००/- सहभागी शुल्क आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या दिवसांत मुलांचे फक्त आमरस पिऊन करीअर नाही बनणार तर काहीतरी डिजिटल स्किलचे प्रशिक्षण घेतल्याने करीअर घडेल नाहीतर एआय तुमच्या नोकऱ्यासुध्दा ताब्यात घेतील आणि बाकीचे  बेरोजगार बसतील आणि पश्चात्ताप करतील ह्यामुळे डिजिटल पाऊले आपण उचलली पाहीजेत आणि आपले भविष्य आपणच सुरक्षित करायला हवे असे प्रशिक्षण शिबिराचे आयोजक तसेच प्रशिक्षक प्रसाद भालेकर यांनी सांगितले. 

 महावितरणचा कारभार म्हणजे बापाची मोरी अन् मुतायची चोरी ! 

(संग्रहित छायाचित्र) 



नाशिक ( ११ मे ) :- नाशिकमध्ये सध्या महावितरणकडून अघोषित भारनियमन सुरू ह्यामुळे ग्राहकांना न कळविताच महावितरणकडून सलग चार ते पाच तास विद्युत पुरवठा खंडित होतो. ग्राहकांना ह्या सर्व गोष्टींचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने दि. ११ मे रोजी सकाळी ९:१५ वाजेपासून विद्युत पुरवठा खंडित झाला असल्यामुळे एका ग्राहकांने ऑनलाईन प्रकारे तक्रार नोंदवली असता महावितरणच्या भद्रकाली येथील कार्यालयातून एका अधिकाऱ्याने ग्राहकांशी फोनवर हुज्जत घातली व माहिती घ्या , लोकल नंबर वर फोन करा, थोडं थांबत जा घरी बसल्या - बसल्या फक्त तक्रार नोंदणी का करतात ? असा सवाल केला . ह्याचे उत्तर महावितरणला जीवन केशरी मराठी माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून रोखठोक पणे देण्यात येते की ग्राहक हे विद्युत सेवा मिळविण्यासाठी पैसे भरतात आणि जर पैसे भरण्यासाठी दोन दिवस उशीर झाल्यास तुम्ही त्यांच्या विद्युत पुरवठाचे कनेक्शन बंद करतात तर ग्राहकांचा मान ठेवणे व त्यांना सेवा सुरळीत देणे प्रथम कर्तव्य आहे. सध्या नाशिकमध्ये उन्हाचे तापमान सुध्दा ४० पार आहे. ह्यामुळे लहान मुलांना गरमींमुळे त्रास होतो तसेच गृहीणींना स्वयंपाक करतांना गॅसजवळ प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ह्यामुळे महावितरणने त्वरित एक यंत्रणा उभारावी ज्यामध्ये भारनियमनासंदर्भात ग्राहकाला ४ तासांअगोदर कळविले गेले पाहिजे आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर जर सुरळित करण्यासाठी उशीर होणार असल्यास त्याचीही माहिती त्याला मिळणे आवश्यक आहे.‌ ग्राहकांशी सुध्दा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर त्वरित आपली तक्रार दाखल करावी हि सेवा मोफत नव्हे आणि महावितरणचा सावळा गोंधळ आणि कारभार ग्राहकांनाच नडतो . ह्या विषयावर “ बापाची मोरी आणि मुतायची चोरी ” ही म्हण बरोबर बसते हे म्हणायला वावगे ठरणार नाही....! ह्या विषयावर काही कारवाई होईल का ? ग्राहकांना होणाऱ्या अत्याचारावर न्यानदाता न्याय देईल का ? की ग्राहकांना पैसे देऊनही वीजेशिवाय राहून लोकशाहीच्या मार्गाने जर ग्राहक तक्रार दाखल करत असेल तर त्या ग्राहकावर दडपशाही सुरू राहील ? ह्या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरीत आहेत. दि. ११ मे २०२४ ला सकाळी ९:१५ ते ठिक दु. १:३६  वाजेपर्यंत हा अघोषित भारनियमन सुरूच होता. ग्राहकांना होणाऱ्या असुविधेची महावितरण दखल घेईल की आपल्या हलगर्जीपणेची पेटंट केलेली कला सुरू राहील. त्याचप्रमाणे महावितरणच्या कस्टमर केअर नंबरवर सुध्दा त्वरीत तक्रार दाखल किंवा इतर गोष्टी करतांना अनेक अडचणींचा ग्राहकांना सामना करावा लागतो. 

“डिप्लोमा vs १२वी: करिअर की सापळा? महाराष्ट्रातील शिक्षणाचे उघड वास्तव”

Diploma vs 12वी Engineering Admission 2025 | Lateral Entry Seats | Reservation Reality | JKMVS ...