Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

 महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तट रक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे




भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या सागरी भागातील सुरक्षा उपाययोजनांसाठी महाराष्ट्र शासनाकडून भारतीय तटरक्षक दलाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यानी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्राचे कमांडर तथा महासंचालक अनुराग कौशिक, निवृत्त कमांडर मिलिंद पाटील आदी उपस्थित होते. 

या भेटीत श्री. बाडकर यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना महाराष्ट्रातील सागरी भागातील सुरक्षा उपाययोजनांची माहिती दिली. तटरक्षक दलाच्या रत्नागिरी येथील हवाई सुरक्षा सुविधांचा आढावा सादर केला. विशेषतः वरळी येथील सुविधांचे तात्काळ अद्ययावतीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वरळीसह, राज्यातील सागरी परिक्षेत्रात तट रक्षक दलासाठी आवश्यक अशा सोयी-सुविधा उभारणी करिता महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.

सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

 मौजे सुकेणे महाविद्यालयात रासेयो स्थापना दिन

मौजे सुकेणे ता निफाड येथील कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य रायभान दवंगे, विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे, सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी प्रतिनिधी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २५- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन प्राचार्य रायभान दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला अध्यक्षस्थानी ज्यु कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे होते सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले प्रास्ताविकातून प्रा दिनकर रसाळ यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा करण्याचा हेतू विशद केला यावेळी कलामंचच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय सेवा योजना गीत सादर केले याप्रसंगी विद्यार्थिनी कु तेजस्विनी काळोगे,कु साक्षी गायकवाड,कु श्रद्धा जाधव ,कु पूजा तिडके तर शिक्षकांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा राजेंद्र धनवटे यांनी मनोगत व्यक्त केले प्राचार्य दवंगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा सचिन भंडारे ,विजय मोगल, सुनील आहेर, शुभांगी गांगुर्डे, माहेश्वरी मत्सागर, पूजा बोराडे, कविता गीते ,राहुल गीते ,महेश निकम,चिंधू गांगुर्डे यांनी प्रयत्न केले सूत्रसंचालन प्रा दिनकर रसाळ यांनी तर आभार प्रा ज्ञानेश्वर वाघ यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

 

ठाण्याचा रुद्रांक्ष पाटील आशियाई नेमबाजी स्पर्धेत चमकला


आशियाई क्रीडा स्पर्धेत एअर रायफल्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक


रूद्रांक्ष बाळासाहेब पाटील 



आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंह पनवर, ऐश्वर्य सिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे. याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या तिघांचे विशेष कौतुक केले आहे.

रूद्रांक्ष पाटील, दिव्यांश सिंह पनवर , ऐश्वर्य सिंह तौमर 


चीनमधील फुयांग (हांगजोऊ) येथे सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांच्या संघाने १० मीटर एअर रायफल्स प्रकारात चमकदार कामगिरी केली आहे. यात रुद्रांक्ष, ऐश्वर्य आणि दिव्यांश यांनी सुरूवातीपासूनच कामगिरीत सातत्य ठेवून गुणांची कमाई करीत, संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. रुद्रांक्ष पाटील हा ठाण्याचा खेळाडू आहे. त्याच्या नेमबाजीतील नैपुण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाठबळ दिले आहे.  


मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या तिघांचेही विशेष कौतुक म्हटले आहे की, भारताने नेहमीच आशियाई क्रीडा स्पर्धेवर वर्चस्व राखले आहे. यंदाच्या या स्पर्धेत सुरूवातच या तिघांनी नेमबाजीत सुवर्ण पदकाचा वेध घेऊन केली आहे. यासाठी या खेळाडुंचे, त्यांच्या प्रशिक्षक-मार्गदर्शकांचे आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या कुटुबियांचे देखील कौतुक करावे लागेल. अशा जिद्दी आणि मेहनती खेळाडुंच्या कामागिरीच्या जोरावरच भारताची यंदाच्या या स्पर्धेतील कामागिरी अशीच दिमाखदार राहील आणि आपला भारत या स्पर्धेत पदक तालिकेत अव्वल राहील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या यशस्वीतेसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडुंच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.



रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

  

 मौजे सुकेणे विद्यालयात आजी आजोबा दिन

आजी आजोबा दिन काळाची गरज - अर्जुन तात्या बोराडे

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात आजी आजोबा दिन कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे व्यासपीठावर प्राचार्य रायभान दवंगे व आदी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २४- बदलत्या संस्कृतीच्या काळात छोट्या कुटुंबांचे महत्त्व वाढत चालले असले तरी मुलांना खऱ्या अर्थाने संस्कार करण्याचे काम आजी-आजोबाच करतात त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार घडून येतात असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे यांनी केले ते मौजे सुकेणे येथील कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालयात आजी आजोबा दिन कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते ज्या घरामध्ये आजी आजोबा आहे त्या घरातीलच मुले संस्कारक्षमच घडतात त्यामुळे आजी आजोबा दिन साजरा होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते तर व्यासपीठावर आजी वत्सलाबाई वाकचौरे, मंगला खोडे, लता सगर, सुनंदा पगार, मेघा शेजवळ, विठाबाई धुळे तर आजोबा मधुकर खोडे, रहीम पठाण, निवृत्ती धुळे, यादव सोनवणे, एकनाथ हळदे, बाळासाहेब निरभवणे, भास्कर गांगुर्डे आदी उपस्थित होते सुरुवातीला उपस्थित आजी आजोबांच्या हस्ते गणपतीची आरती घेण्यात आली यावेळी उपस्थित आजोबा व आजींनी मनोगत व्यक्त करत शासन व शाळांच्या या स्तुत्य उपक्रमाची गरज असल्याचे प्रतिपादन केले यावेळी उपस्थित आजी आजोबांचा शालेय प्रशासनासह त्यांच्या नातवांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी उपस्थित आजी आजोबांचे स्वागत करत

 मुलांचे पहिले व शेवटचे खरे मित्र आजी आजोबाच असतात ज्या घरात आजी आजोबा आहे ते नातवंडे भाग्यवान असल्याचे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद ताकाटे यांनी केले कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे यांच्या सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते 


शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

 अमित शाह यांचे मुंबईत आगमन ; वर्षा बंगल्यावर गणपती दर्शन 

केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचे स्वागत करतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 




मुंबई:- केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांचे एकदिवसीय दौऱ्यासाठी आज दुपारी मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. शाह यांचे स्वागत केले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनीही श्री. शाह यांचे स्वागत केले.

 

अमित शाह यांचे वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पांचे दर्शन 

यानंतर मा.श्री. अमित शाह मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्निक भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. शाह यांचे श्री गणेश मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मनोज कोटक आणि पूनम महाजन, आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते.

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

 नागरीकांच्या झोपा उडवून पालिका झोपेत ?



नाशिक:- मागील काही दिवसांपासून रविवार कारंजा येथील गोरेराम लेन ह्या परिसरात सकाळचा पाणीपुरवठा हा वेळेवर होत नाही. याबाबत नाशिक महानगरपालिकेच्या संबंधित पाणीपुरवठा विभागाचे श्री. जगदीश सुर्यवंशी यांस नागरिकांची समस्या सांगण्यात आली होती परंतु ती तक्रार सांगून देखील पुन्हा पुन्हा संबंधित घटना घडत आहेत. दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी सुध्दा सकाळचा पाणीपुरवठा खंडित होता जो सुर्यवंशी यांना फोन केल्यानंतर सुरू करण्यात आला यानंतर दि. २१ सप्टेंबर २०२३ रोजी सुध्दा सकाळचा पाणीपुरवठा खंडित होता. जो फोन केल्यानंतर ६:१८ वा. आले होते. दि. २२ सप्टेंबर रोजी सुध्दा पाणीपुरवठा हा ६:१५ रोजी सरु झाला. नाशिक महानगरपालिका आपल्या कामात किती प्रमाणात दक्षता बाळगते हे सिद्ध होते. नाशिक शहराचा पाणीपुरवठा करण्याचा जो निर्धारीत वेळ आहे त्या वेळेतच पाणीपुरवठा सुरळीतरीत्या करावा. संबंधित घटनेमुळे परिसरातील सर्व नागरिकांना , गृहिणींना, विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत आहेत. ह्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संतप्त आहेत.



गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

प्रकल्पांची कामे वर्षभरात पूर्ण करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


मुंबई, दि. २१ – राज्यातील जलसंपदा विभागाचे अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी  नाबार्डसह इतर वित्तीय संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारून सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत, राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. 


सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीच्या विषयावर चर्चा करण्यात आली.  बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ‘मित्र’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांच्यासह नाबार्डचे व्यवस्थापकीय संचालक शाहजी केव्ही, एलआयसीचे श्री. पांडे आणि एसबीआय कॅपिटलचे कार्यकारी उपाध्यक्ष राजन गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. 


राज्यातील निवडक ८९ लघु सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत असून ते पूर्ण करण्याकरिता ७ हजार ३५१ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हे प्रकल्प एका वर्षात पूर्ण झाल्यास सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे अतिरिक्त निधी उभारण्यासाठी वित्त, नियोजन, जलसंपदा, लाभक्षेत्र विकास यांचे अपर मुख्य सचिव आणि ‘मित्र’ चे सीईओ यांनी एकत्रित निर्णय घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. 


ज्या प्रकल्पांसाठी ५० टक्क्यांपेक्षा अधिक भूसंपादन झाले आणि ज्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद नाही त्याच प्रकल्पांच्या कामांसाठी अतिरिक्त निधी उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. नगरविकास विभागाच्या नगरोत्थान योजनेमधील आणि अमृत योजनेतील १४४ प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ४ हजार ६८६ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे, त्यादृष्टीने देखील नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या अपूर्ण प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी उभारण्यासाठी शासनाकडून सर्वेतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली. 

महाराष्ट्र सिंचन आधुनिकीकरण कार्यक्रमातून कालव्यांची कामे केली तर पैशांची बचत होण्याबरोबरच तातडीने कामे पूर्ण होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

“डिप्लोमा vs १२वी: करिअर की सापळा? महाराष्ट्रातील शिक्षणाचे उघड वास्तव”

Diploma vs 12वी Engineering Admission 2025 | Lateral Entry Seats | Reservation Reality | JKMVS ...